भारतीय लसींना जगभरातून मागणी, ९ देशांनी मागितली मदत


 


देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला अ‍ॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी बोलसोनारो यांनी केली आहे. मात्र भारताने करोनासंदर्भातील जे धोरण तयार केलं आहे त्यानुसार सर्वात आधी भारत आपल्या शेजरच्या देशांना करोनाची लस देणार आहे. त्यानंतर जगभरातील इतर देशांमध्ये करोनाची लस पाठवली जाणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारत सुरुवातीपासूनच करोना विषाणूच्याविरोधातील युद्धात जगभरातील देशांसोबत खांद्याला खांदा लावून लढत आहे. या लढाईमध्ये सर्व देशांशी सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य असल्याची भारताची भूमिका आहे. या करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताला जास्तीत जास्त देशांची मदत करता यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेन्का कोविड-१९ लस आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ला आपत्कालीन वापरसाठी भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

दिवसोंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारताने करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझील, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांनी भारताकडे करोनाच्या लसीची मागणी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत इतर देशांना करोनाच्या लसीचा पुरवठा करताना शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देणार आहे. त्यामुळेच बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना भारत आधी लसींचा पुरवठा करणार असल्याचे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment